बुधवार, ८ जून, २०२२

आकाशवाणी प्रकाशवाणी

पूर्वी फक्त आकाशवाणी होती. त्यावरच्या बातम्या लोक ऐकत. त्या बातम्या नीट लिहिलेल्या, सुसंगत असत. वाचणारे नीट उच्चार करणारे, वाचण्याचा सराव असलेले असत. त्यामुळे ऐकणाऱ्यावरही भाषेचे संस्कार होत. कुठला उच्चार कसा, शब्द कसे तोडले जातात, कसे जोडले जातात, वाक्य कसे बोलायचे, पॉज कुठे कसा घ्यायचा, वाक्याचा प्रवाहीपणा हे सगळे आपोआप, नकळत समजत असे, मुरत असे. स्वाभाविकच ते प्रकट होत असे. याचा अर्थ सगळेच चांगले वाचणारे, लिहिणारे, बोलणारे होते असे नाही. पण सरासरी गुणवत्ता बरीच चांगली होती. आज प्रकाशवाणीच्या बातम्यांमुळे ही सगळीच गुणवत्ता घसरली आहे. शिवाय दृश्य गोष्टीचा परिणाम असा होतो की, सगळे लक्ष दृष्याकडेच जाते. बातम्या सांगणारे त्यानुसार बोलतात, वेळेवर सुचेल तसे, अडखळत, असंबद्ध वगैरे. त्यामुळे एक मोठी सामाजिक निरर्थकता जन्माला येते आहे.

- श्रीपाद कोठे

९ जून २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा