रविवार, २६ जून, २०२२

प्रश्न पाण्याचा

चेन्नईत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अकोला, यवतमाळला गेली कित्येक वर्षे पाणीटंचाई आहे. त्याची चर्चा झाली नाही. तरीही ठीक आहे. देर आये दुरुस्त आये. नीती आयोगाने सुद्धा २०२० मध्ये म्हणजे पुढल्याच वर्षी २१ शहरे पाणी प्रश्नाने ग्रस्त होतील असे म्हटले आहे. २०३० पर्यंत पाण्याची वानवा होईल असेही नीती आयोगाने म्हटले आहे. आपल्या शहराचा, गावाचा क्रमांक कसा आणि किती लवकर लावायचा याचा विचार करायला लागू या. कारण त्याशिवाय वेगळा काही विचार आम्ही करू शकतो का याची मला शंका आहे. तहान लागल्यावर विहीर खोदली जाऊ शकते पण विहिरीत पाणी नाही आणले जाऊ शकत. एवढे होऊनही आम्हाला (सामान्य माणसाला, प्रशासनाला, सरकारला, राजकीय नेत्यांना, उद्योगपतींना, धनिकांना, गरिबांना, शिक्षितांना, अशिक्षितांना, स्त्रियांना, पुरुषांना) जर पाण्यापेक्षा अन्य गोष्टीच महत्वाच्या वाटत असतील तर तेच ठीक.

- श्रीपाद कोठे

२७ जून २०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा