रविवार, १९ जून, २०२२

लोकशाही

लोकशाही म्हणजे केवळ मतदान नाही. ती केवळ सुरुवात आहे. सगळ्या गोष्टीतील लोकसहभाग हा लोकशाहीचा अर्थ. मग त्या दिशेने जायला काय हरकत आहे? धोरणे, निर्णय, अंमलबजावणी हे केवळ शासन, प्रशासन, आयोग, तज्ञ या स्तरावर राहण्यापेक्षा; जे करायचे ते किमान वर्ष-दोन वर्षे समाजात चर्चेसाठी का ठेवण्यात येऊ नये. समाजव्यापी चर्चा होऊ द्यावी. त्यातून कल, कंगोरे, कोन लक्षात येऊन स्पष्ट होतील. त्यानुसार निर्णय घ्यावे. त्यामुळे लादल्याची भावनाही उत्पन्न होणार नाही.

- श्रीपाद कोठे
१९ जून २०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा