शनिवार, ४ जून, २०२२

भाज्यांची चव

आज दिवसभर पर्यावरण दिनाची चर्चा होती. मनात एक विचार आला- आपण आजकाल ऐकतो, बोलतो, वाचतो की भाज्यांना चव नाही, फळांमध्ये रस नाही वगैरे. भाज्या, फळे, धान्य वगैरे नि:सत्व होते आहे. शास्त्र सांगते की भाज्या, फळे, धान्य इत्यादीत लोह, कॅल्शियम, प्रथिनं आणि काय काय असते. याची संगती लावताना वाटले, या पदार्थात शरीराला पुष्ट करणारे घटक असतात/ असायला हवेत. आजकाल मात्र त्यांची पोषणक्षमता कमी झाली आहे. आपण जमिनीतून आपल्या गरजांसाठी सगळी खनिजे वगैरे काढून घेतो आहोत, ओरबाडून घेतो आहोत. मग ती झाडांमध्ये आणि त्यातून आपल्या शरीरात पोहोचतील कशी? पर्यावरणाचा विचार करताना आणि दिन पाळताना याही अंगाचा विचार होऊ शकतो/ व्हायला हवा.

- श्रीपाद कोठे

५ जून २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा