रविवार, १९ जून, २०२२

जोडाक्षरे

आकाशवाणीवर त्यावेळी लागणार सांजधारा कार्यक्रम आठवतो. आठवड्याचा एक दिवस विशेष व्यक्ती तो सादर करीत असे. आपल्या आवडीची गाणी आणि गप्पा, आठवणी सांगणे. एक कार्यक्रम सादर केला होता सई परांजपे यांनी. त्यात उच्चार, जिभेचे वळण यावर बोलताना त्यांनी स्वतःची आठवण सांगितली होती की, 'लहानपणी घरी आग्रहाने, रागावून, लोभाऊन श्री रामरक्षा पाठ करायला लावली होती. इच्छा नसे, ओरडा खावा लागत असे; पण पाठ केली आणि रोज म्हणण्याचा उपक्रम अनेक वर्षे चालला. अर्थात घरच्यांच्या आग्रहाने. मात्र त्यामुळे tounge twisting खूप उत्तम साधलं. भाषा, उच्चार, त्यातले बारकावे आत्मसात झाले.'

आज दर्जा नकोच असेल तर त्याला काय उपाय आहे? कालपासून जोडाक्षरे आणि अंक याबाबतच्या निर्णयाचे स्वागत आणि समर्थन करणाऱ्या पोस्ट देखील वाचायला मिळाल्या. एकच वाटते - कोणत्याही गोष्टीचे सोपीकरण कठीणपणाच्या आकलनाच्या दिशेने हवे. सुमारीकरणाच्या दिशेने नको. आजवर नेमके तेच झाले आहे. भाजी विकणाऱ्या महिलांची उदाहरणे देऊन वीस-दोन, नव्वद-पाच चे समर्थन करताना हे लक्षात घ्यावे. शिवाय जोडाक्षरांचे काय? अन तज्ञांचे हवाले देताना, आजची परिस्थिती तज्ज्ञांनीच आणलेली आहे याचा विसरही नको पडायला.

- श्रीपाद कोठे

१९ जून २०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा