गुरुवार, १६ जून, २०२२

प्रश्न विचारा

लोकसभा निवडणूक जिंकल्यावर केलेल्या भाषणात पंतप्रधान मोदी म्हणाले होते, `मलाही प्रश्न विचारा. माझीही परीक्षा घ्या. माझ्या छोट्यातील छोट्या गोष्टीवर नजर ठेवा आणि त्याची चिरफाड करा.' हे आज आठवण्याचे कारण म्हणजे ललित मोदी प्रकरण. या प्रकरणी मोदींचे, भाजपचे समर्थक ज्या पद्धतीने प्रतिक्रिया देत आहेत, ते मुळीच योग्य वाटत नाही. होऊन जाऊ द्या ना दुध का दुध, पानी का पानी. त्याने असे केले, त्याने तसे केले; म्हणून आम्हाला शिकवू नये वगैरे फारच हास्यास्पद आहे. `सत्यमेव जयते' टिकले तर राष्ट्र टिकेल. अन सत्यासाठी `मी' `तू' पणाच्या पलीकडे जावे लागेल. त्याला पर्याय नाही.

- श्रीपाद कोठे

१७ जून २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा