बुधवार, २३ फेब्रुवारी, २०२२

कीव करावी

खरंच हसावं की रडावं कळत नाही. यांच्या बुद्धीची तर क्षणोक्षणी कीव येते. ५२ वर्षे संघाने आपल्या इमारतीवर तिरंगा फडकावला नाही, म्हणून-

१) विद्यापीठात तिरंगा फडकावण्याचा निर्णय चूक?

२) त्या निर्णयाला आमचा विरोध?

बिचाऱ्यांची पंचाईत ही झाली आहे की, ध्वजाचा रंग तिरंगा असल्याने `भगवीकरण' पण म्हणता येत नाही.

हे दळभद्री उद्या असेही म्हणतील- या देशात रा. स्व. संघ स्थापन झाला म्हणून आम्ही हा देश विकून टाकू.

किंवा

रा. स्व. संघ या देशाला भारत म्हणतो म्हणून आम्ही याला भारत म्हणण्याला विरोध करतो. (अन असे म्हणणारे आहेत. अगदी व्यक्तिगत माहितीचे आहेत.)

- श्रीपाद कोठे

२४ फेब्रुवारी २०१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा