शनिवार, १२ फेब्रुवारी, २०२२

युद्धस्थिती

अरे राहुल गांधी, सरसंघचालकांच्या वक्तव्यावर ट्विट करण्यापेक्षा - युद्धाची स्थिती आल्यास तीन तासात १० हजार बाटल्या रक्त उपलब्ध करून देऊ, असं आश्वासन द्यायचं होतं. पण तुमच्या आजच्या पुढच्या शंभर पिढ्या आल्या तरी तुझी ती हिंमत नाही. अन सरसंघचालकांवर टीका करणारे सगळे एकत्र आले तरी त्यांची ती ताकद नाही. युद्ध म्हणजे काय ते तरी कळतं का तुम्हाला? युद्धाच्या स्थितीत काय काय करावं लागतं ते कळतं का तुम्हाला? त्या असंख्य कामांसाठी, कठीण परिस्थितीसाठी अनेक प्रकारची माणसे लागतात. संघाने त्यासाठी आपली तयारी तरी दाखवली. तुम्ही एवढे तरी आश्वासन देऊ शकता का की, युद्धाची स्थिती आल्यास, युद्ध संपेपर्यंत आम्ही टीकेचा, टवाळकीचा शब्दही उच्चारणार नाही. तुम्ही आणि तुमचे दळभद्री बुद्धीचे अन दळभद्री वृत्तीचे बाजारबुणगे यांची लायकी अशी बाजारात का मांडता?

- श्रीपाद कोठे

१३ फेब्रुवारी २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा