मंगळवार, १५ फेब्रुवारी, २०२२

सायकल

सहज सायकल वापरता येईल अशी शहरं विकसित केली तर ना महागाई वाढणार, ना विदेशी गंगाजळी कमी होणार, ना प्रदूषण होणार. पण शासन, प्रशासन, राजकारण, उद्योग, अन समाज यांना हे हवं आहे का? सायकल ही फॅशन म्हणून चालवणे पुरेसे नाही. अन सध्याच्या शहरी रचनेत आणि आकारात सायकल हे दैनंदिन जीवनाचं वाहन होऊ शकत नाही. एकीकडे शहरांची सूज दुर्लक्षित करायची अन बाकीच्या गोष्टी करायच्या हे काही फारसं बरोबर नाही. सायकल चालवणे म्हणजे मागासपण, सायकलचा वापर म्हणजे जगाच्या स्पर्धेत माघारणे, सायकलचा वापर म्हणजे हसण्याची गोष्ट, सायकल चालवणारा समाज म्हणजे आदिमानवाचा समाज; ही मानसिकता असेल तोवर काही बदल होऊ शकणार नाही. पण सायकल चालवणे यात काहीही कमीपणा नाही, अगदी काही दशके आधी सिनेमाच्या हिरोईन सुद्धा सायकल चालवीत, स्वयंचलित वाहनांच्या जाळ्यात फसणे म्हणजे काही शक्तींच्या हातचे खेळणे होणे किंवा काही शक्तींना पोसणे; या गोष्टी नीट समजून घेतल्या पाहिजेत.

- श्रीपाद कोठे

१६ फेब्रुवारी २०२१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा