बुधवार, २३ फेब्रुवारी, २०२२

ढोंगी

सगळ्या `अफजल गुरु, कन्हैय्या कुमार, उमर खालिद भक्तांनी' स्मृती इराणी यांचं भाषण नक्कीच ऐकलं आहे. हां, आपण ते ऐकलं हे मात्र ते- इतर कुणाला काय, स्वत:चं स्वत:ला देखील कळू देणार नाहीत. या भक्तांचे कुलदैवत राहुल गांधी, कुलदेवता सोनिया गांधी, अन पुजारी मल्लिकार्जुन खडगे समोरासमोर ऐकणे शक्यच नसल्याने उठून घरी गेले अन एकमेकांपासून लपवित सगळ्यांनी घरच्या टीव्हीवर ते भाषण पाहिले, ऐकले. काय `अफजल गुरु, कन्हैय्या कुमार, उमर खालिद भक्तांनो'- टाकता का काही पोस्ट? तुमच्या पोस्ट पाहायला उतावीळ झालो आहे. की घेऊ तुमची नावे??

स्मृती इराणी यांचे भाषण ऐकताना आपल्याला तर बुवा गुरु गोविंदसिंगजी महाराज आठवले- `सवा लाख से एक लडाउं, तब गोविंद नाम कहाउं' व्वा रे शेरनी...

सगळ्या दलित, मागासवर्गीय, आदिवासी बंधू भगिनींना; विचारकांना, नेत्यांना, कार्यकर्त्यांना एकच प्रार्थना- आता तरी शहाणे व्हा. नुसत्या शब्दांवर अन घोषणांवर जाऊ नका. कॉंग्रेस आणि कम्युनिस्ट राजकारणासाठी किती रोहित तुम्ही गमावणार आहात?

संपूर्ण कॉंग्रेस पक्ष उघडपणे देशद्रोही आहे हेही आज स्पष्ट होऊन गेले हे बरे झाले. `शब्द आणि घोषणा म्हणजे देशद्रोह नसतो' असे निर्लज्ज समर्थन अन तेही दात काढत करणारे ज्योतिरादित्य सिंधिया; एक ऐकून ठेवा- शब्द आणि घोषणा म्हणजे देशद्रोह नसतो हे अगदी खरे आहे. देशद्रोह असतो- त्या शब्दांच्या अन घोषणांच्या मागची भावना. अन ती भावना आज तुम्हीच जगजाहीर केलीत. तेही भर लोकसभेत. देशभक्तीची बातच सोडा; साधे माणूस असाल तरी यानंतर जगाला आपले तोंड तुम्ही दाखवणार नाही. अर्थात तुम्ही माणूस आहात अशीही आम्हाला अपेक्षा नाहीच म्हणा.

- श्रीपाद कोठे

२४ फेब्रुवारी २०१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा