शुक्रवार, २५ फेब्रुवारी, २०२२

शुंभ निशुंभ

सुग्रास भोजन आणि विष्ठा दोन्हीही एकाच जीवन नावाच्या गोष्टीचे भाग आहेत. दोन्हीची जागा, आवश्यकता आणि दोन्ही हाताळण्याच्या पद्धती, दोन्ही बद्दलचा attitude; वेगळे असतात, असावेच लागतात. दोन्ही जीवनाचा भाग आहेत म्हणून कोणी भरल्या ताटात विष्ठा आणून टाकत नाही. आज मात्र असे लोक दिसायला लागले आहेत. असे लोक आताच जन्माला आले आहेत की समाज माध्यमांमुळे पूर्वीपासून अस्तित्वात असलेले ते आता दिसू लागले आहेत, हे सांगणे अवघड आहे. एक गोष्ट मात्र खरी की, पोच नसणारे असे लोक याच क्षणी कैलासवासी वा वैकुंठवासी झाले तरी काही फरक पडणार नाही. उलट पडलाच तर चांगला फरक पडेल. दुर्दैवाने अशा नतद्रष्ट लोकांपुढे मानवी सभ्यता हतबल होते. शुंभ निशुंभ मातणे म्हणजे काय ते पुराणात पाहण्याची गरजच उरलेली नाही. वर्तमानात आपल्या आजूबाजूलाच ते आहेत.

- श्रीपाद कोठे

२६ फेब्रुवारी २०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा