बुधवार, ९ फेब्रुवारी, २०२२

राजकारण

संसदेतील भांडणे, उत्तरप्रदेशातील यादवी, तामिळनाडूतील तमाशा, अमेरिकेतील ट्रंप युग, महाराष्ट्रातील निवडणुका- राजी, नाराजी, तत्वनिष्ठा, व्यावहारिकता; असं सगळं उघड्या डोळ्यांनी पाहूनही (अन कित्येक युगं हेच पाहूनही) -

१) राजकारणात चांगल्या माणसांनी उतरलं पाहिजे,

२) मतदान करून अंकुश ठेवला पाहिजे,

३) प्रतिनिधीला परत बोलावण्याची तरतूद हवी,

इत्यादी इत्यादी इत्यादी गोष्टींवर श्रद्धापूर्वक भर देणाऱ्या लोकांच्या बालबुद्धीची कीव करावी की हसावं?

- श्रीपाद कोठे

१० फेब्रुवारी २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा