बुधवार, २३ फेब्रुवारी, २०२२

किंमत

'देशातला काम करणारा प्रत्येक माणूस हा समान महत्वाचा आहे. प्रत्येक घटक राष्ट्रउभारणी करतोच. एक सैनिक तेव्हढेच महान आणि बाकीच्यांनी अपराधगंड बाळगावा हा भंपकवाद प्रत्येक नागरीकाने नाकारायलाच हवा.'

राजू परुळेकर यांची ही पोस्ट एकाने पाठवली आणि माझा अभिप्राय विचारला. मी त्या मित्राला कळवलेला अभिप्राय -

'काल इंडिया टीव्हीवर रजत शर्मा यांच्या 'आपकी अदालत'मध्ये एका मुलीने मेहबूबा मुफ्ती यांना प्रश्न विचारला - तुम्ही म्हणता युद्धाने प्रश्न सुटत नाही, पण चर्चेने तरी प्रश्न कुठे सुटला?'

त्यावर मेहबूबा यांचे उत्तर होते - तुझे म्हणणे बरोबर आहे पण दोघात फरक आहे. युद्ध अपयशी ठरलं तरी अन्य हानीसोबत दोन्ही बाजूची जीवहानी होतेच होते, चर्चा अपयशी ठरल्यावर असे होत नाही.'

परुळेकर यांच्या भंपक तर्काला मेहबूबा मुफ्ती यांच्या उत्तरातून अनायास उत्तर मिळाले आहे. मित्राला कळले असेल आणि आपल्याला कळेल अशी आशा करतो.

- श्रीपाद कोठे

२४ फेब्रुवारी २०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा