गुरुवार, १७ फेब्रुवारी, २०२२

मणिशंकरचा थयथयाट

सुदर्शन वाहिनीवर `walk the talk' सुरु होता. मणिशंकर अय्यरचा. प्रश्न विचारत होते वाहिनीचे संपादक चव्हाणके. बोलता बोलता अय्यर बोलले- `या देशाची महानता आहे की त्याने सगळ्यांचे स्वागत केले. सगळ्यांना आसरा दिला. आदर केला. म्हणूनच जगातील पहिले चर्च भारतात उभे राहिले. ख्रिस्ताच्या मायभूमीत अन कर्मभूमीत सुद्धा चर्चेस नंतर उभी झालीत.' त्यावर संपादक चव्हाणके यांनी लगेच प्रश्न केला- `ख्रिश्चन लोकांशी असा आत्मीय व्यवहार करणारे कोण होते? तुम्ही म्हणता तसे घडण्यापूर्वी येथे कोण होते? तुम्ही म्हणता तो देशाचा स्वभाव घडवणारे, जोपासणारे कोण होते?' अन लगेच मणिशंकर अय्यरचा स्वर बदलला. म्हणाले- `ते तुम्ही हिंदू हिंदू नका करू.'

ढोंगीपणा, बेशरमपणा, दुतोंडीपणा, मस्तवालपणा, क्षुद्रता यापेक्षा वेगळी काही असू शकते?

- श्रीपाद कोठे

१८ फेब्रुवारी २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा