शुक्रवार, १३ मे, २०२२

स्वयंपूर्ण जिल्हा

कोरोना एक गोष्ट शिकवतो आहे पण त्याची फारशी चर्चा होताना दिसत नाही. त्याचा एक संदेश हा आहे की; अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, पाणी, वीज, दळणवळण; या बाबतीत स्वयंपूर्ण असलं पाहिजे. या क्षणापासून त्या दिशेने प्रयत्न झाले तर भविष्यात त्याचा फायदा होईल हे निश्चित. ही स्वयंपूर्णता नीट लक्षात मात्र घ्यायला हवी. याबाबतीत देश स्वयंपूर्ण व्हावा एवढे म्हणणे आणि तसा प्रयत्न करणे पुरेसे नाही. कारण ते संदिग्ध होऊन जाते. देश स्वयंपूर्ण होऊनही लोकांना त्याचा उपयोग होईलच असे नाही, लोकांना त्यापासून सुखकर जीवन मिळेलच असे नाही. त्यामुळे वर नमूद केलेल्या बाबींमध्ये देशाने स्वयंपूर्ण होण्याचा विचार मनात ठेवून, प्रत्येक जिल्हा या बाबीमध्ये अधिकाधिक स्वयंपूर्ण व्हावा अशी शब्दावली प्रचारात यायला हवी. बाकीच्या गोष्टी थोड्या मागे ठेवता येऊ शकतात पण या मूलभूत गोष्टी प्राधान्याने व्हाव्यात.

- श्रीपाद कोठे

१४ मे २०२१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा