रविवार, २२ मे, २०२२

बिना आंघोळीने

मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघ शिक्षा वर्गाचं प्रशिक्षण घेतलं तेव्हा महिन्याभरात एकदा किंवा दोनदा सूचना राहत असे- `आज पाणी पुरेसे उपलब्ध नाही. त्यामुळे कोणीही आंघोळी करू नये. पिण्याचे पाणीही जपून वापरावे. वाया घालवू नये.' वर्गातील शेकडो स्वयंसेवक (वर्गात प्रशिक्षण घेण्यासाठी आलेले, शिक्षक, वर्गाच्या व्यवस्थेतील, अधिकारी... सगळे स्वयंसेवक) सूचनेचे पूर्ण पालन करीत आणि भर मे महिन्याच्या नागपुरातील उन्हाळ्यात कोणतीही कुरकुर न करता आनंदाने राहात. वर्गाच्या संपूर्ण दिवसाच्या कार्यक्रमातही काहीही बदल होत नसे.

संघ शिक्षा वर्गाचे द्वितीय वर्ष क्षेत्रश: सुरु झाले, तेव्हा नागपूरच्या स्वयंसेवकांच्या गटासोबत मी, विजय खळतकर आणि श्याम पत्तरकिने असे तिघे जण शिक्षक-व्यवस्थापक म्हणून नाशिकला गेलो होतो. तेथे गोदावरीच्या काठावर गंगापूर रोडला के.टी.एच.एम. महाविद्यालयात वर्ग होता. त्या वर्गात पहिल्यांदा पूर्ण महिनाभर आंघोळ करायला मिळाली. पाण्याची कमतरताच नव्हती. एक तर बाजूच्या गोदावरीमुळे ऊन जाणवतच नव्हते. रात्री तर थंडी वाजत असे. त्यावेळी याच गोष्टींचे खूप अप्रूप वाटले होते.

- श्रीपाद कोठे

२३ मे २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा