रविवार, २९ मे, २०२२

लक्ष्मणरेषा

स्वा. सावरकर यांच्या संबंधात घेतलेल्या चर्चेच्या शीर्षकावरून एबीपी माझा रोष झेलत आहे. त्या कार्यक्रमाला दिलेले खोडसाळ शीर्षक अयोग्य होतेच. त्यावर आक्षेप, दबाव आणि नंतर दिलगिरी व्यक्त करीत दुसरा कार्यक्रम; येथवर योग्यच झाले. परंतु आता जाहिरातदारांना जाहिराती न देण्यासाठी आवाहन, चॅनेलवर बहिष्कार; आदी जे सुरू आहे त्याच्याशी सहमत होता येत नाही. प्रामाणिक मतभेद, प्रामाणिक विचारभेद, खोडसाळपणा, दुष्टपणा, देशद्रोह (यादीत भर घालता येईल) असे विविध प्रकार असतात. त्याचा विरोध करण्याच्या, त्याला आळा घालण्याच्याही पद्धती असतात. त्यांचे तारतम्य असले पाहिजे. हातावरची माशी मारायला तलवार वापरणे व्यवहार आणि मानसिकता दोन्ही अर्थाने चुकीचे ठरते. ज्या हिंदुत्वाचा रथ आज पुढे निघाला आहे त्याचे वैशिष्ट्यच लक्ष्मणरेषा हे आहे. जगाच्या व्यवहारात सगळ्याच भल्याबुऱ्या गोष्टी असतात, पण लक्ष्मणरेषेचे भान राखणे आवश्यक असते. ते राखले नाही तर मूळ हिंदुत्व आशयच गमावल्यासारखे होईल.

- श्रीपाद कोठे

३० मे २०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा