बुधवार, २५ मे, २०२२

गरमी

या मोसमात देशभरात गरमीने ६०० लोकांचा बळी घेतला आहे. अनेकांना विविध आजार आणि त्रास होत आहेत ते वेगळे. ही गरमी आज नव्याने आलेली नाही. भारताचे भौगोलिक स्थान असेच आहे की, येथे गरमी स्वाभाविक आहे. ती काल होती, आज आहे अन उद्याही राहील. फरक फक्त एवढाच झाला आहे की, गरमी शोषणारे घटक कमी झाले आहेत आणि गरमी वाढवणारे घटक वाढले आहेत. माती, पाणी, झाडे कमी झालीत. त्यांची जागा सिमेंट कोन्क्रीटने घेतली. सिमेंट कोन्क्रीट, टाईल्स, काचा, धातू इत्यादी गोष्टी उष्णता शोषून घेत नाहीत. दुसरीकडे, एअर कंडीशनर, पेट्रोलचे ज्वलन, विजेचा वापर हा उष्णता उत्सर्जित करतो आहे. जी तल्लखी जाणवते ती त्यामुळे. यात बदल करून उष्णता शोषून घेणारे घटक वाढवून आणि उष्णता उत्सर्जित करणारे घटक कमी करून बदल घडवता येईल. कोण घडवेल? तुम्हा आम्हालाच करावे लागेल. आपण करू का?

- श्रीपाद कोठे

२६ मे २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा