शनिवार, २८ मे, २०२२

आरक्षण

आठ दिवसांचे गुर्जर आंदोलन ५% आरक्षण पदरात पाडून घेऊन अखेर संपले. नेहमीप्रमाणेच उनाड मनात विचार आला-

पूर्वी जातींच्या रूपाने १००% आरक्षण होते. आता सगळीकडे एक घास, दोन घास, चार घास; असे तुकडे असतात. पूर्वी एकगठ्ठा एकाधिकार होता. दुसऱ्या कोणालाही कसला वाटा नाही. त्या व्यवसायातील पैसा तुमचाच, माणसे तुमचीच, तंत्रज्ञान तुमचेच, अन्न तुमचेच, मुली तुमच्याच. तुमच्या कसल्याही गोष्टीवर दुसऱ्या कुणाचा काहीही उजर नाही. होते आरक्षणच. दोन आरक्षणाचे प्रकार फक्त वेगळे. कोणते चांगले, कोणते वाईट; कसे ठरवायचे? आणि त्याविरुद्ध कल्ला तरी का करायचा?

- श्रीपाद कोठे

२९ मे २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा