मंगळवार, २४ मे, २०२२

रामदेवबाबा विवाद

रामदेवबाबा विवाद हा आपली विचार पद्धती किती सडली आहे याचं उदाहरण आहे. लिहिता पुष्कळ येईल पण तूर्त एकच मनोभाव - उपचार पद्धती आणि वैद्यकीय पद्धतींच्या तुलनात्मक चिकित्सेचा विषय कचऱ्याच्या टोपलीत जाऊ नये.

प्रामाणिक भावना, प्रामाणिक कृती, प्रामाणिक कष्ट; हे सगळ्या गोष्टींचं समर्थन नाही होऊ शकत. विद्यमान वैद्यक शोषण करतं, त्यात बऱ्याच त्रुटी आहेत, त्याला पुष्कळ चिकित्सेची गरज आहे; हे का नाकारावं; याकडे का दुर्लक्ष करावं? आधुनिक वैद्यक परिपूर्ण आहे का?

ज्या पद्धतीने ima चे लोक चिडले त्यावरून 'दाल मे कुछ काला है' हा निष्कर्ष काढता येऊ शकतो. अशा विचार पद्धतीने कोणत्याही शास्त्राचा किंवा मानवतेचा विकास नाही होऊ शकत. हा विवाद भारतीय ethos शी सुसंगत नाही.

साध्या नाक्यावरच्या औषध दुकानदारांनाही चारचाकी गाड्या अन विदेश पर्यटन offer करणाऱ्या औषध कंपन्या नफेखोरी करत नाहीत का?

अलोपॅथी काय किंवा आयुर्वेद काय किंवा होमिओपॅथी काय; कोणाकडेही रामबाण उपाय नाही, जादूची कांडी नाही. आरोग्य क्षेत्रासाठीचे हे वाक्य जीवनाच्या अन्य क्षेत्रांनाही लागू होतेच. प्रमाणपत्र आणि प्रशस्तीपत्र यातून मानवजात बाहेर यायला हवी.

या देशाची संस्कृत भाषा, या देशातील विभिन्न मातृभाषा, या देशातील वेशभूषा, या देशातील खाद्यपदार्थ; सगळं एकेक संपवणं सुरू आहे. त्यात आयुर्वेदही आहे. एकेक करून सगळ्या गोष्टी आपल्या ताब्यात घेण्याच्या भांडवलशाही वृत्तीचा हा प्रयत्न आहे. भांडवलशाहीला विरोध करणारे डावे मात्र, दुर्दैवाने भारत विरोधासाठी भांडवलशाही set करत असलेल्या अजेंड्याला पाठिंबा देतात.

- श्रीपाद कोठे

२५ मे २०२१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा