रविवार, १५ मे, २०२२

कालमहिमा

कोणीतरी कधीतरी बोललं की, हिंदू लोक माहीतच नसलेल्या गोष्टी कवटाळून बसतात अन प्रत्यक्ष प्रत्ययाला येणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून निरर्थक जीवन जगतात. झाले, आपणही त्याचीच री ओढू लागलो अन खाणे-पिणे, मौजमजा, स्पर्धा-  संघर्ष- कुरघोडी- म्हणजेच सारसर्वस्व आहे असे समजून तसे वागू लागलो. जणू काही तो जो कोणी जे काही बोलला तेच सत्य आहे असे समजून... त्यावर प्रश्न विचारावे, तर्क मांडावे, भवती न भवती करावी असेही आम्हाला वाटले नाही. यालाच म्हणतात का कालमहिमा??

- श्रीपाद कोठे

१६ मे २०१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा