गुरुवार, ५ मे, २०२२

ईश्वर

भारताबाहेरील धर्ममते ईश्वर प्राप्त करण्याचा उपदेश देतात. ईश्वर प्राप्त करून त्याला मुठीत ठेवून त्याच्याकडून हवे तसे हवे ते मिळवण्याचा सल्ला देतात. भारतातील धर्ममते ईश्वर होण्याचा उपदेश देतात. ईश्वर प्राप्त करणे आणि ईश्वर होणे यात खूप मोठा फरक आहे. अन्य गोष्टींप्रमाणेच धर्ममतेही पाश्चात्य प्रभावाखाली आली असल्याने भारतात देखील ईश्वर प्राप्त करण्याची चढाओढ सुरु असते. ते बदलण्याची आणि मूळ भाव जागा करण्याची गरज आहे.

- श्रीपाद कोठे

६ मे २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा