मंगळवार, २४ मे, २०२२

चर्चेची भाषा

आपल्या विचारांची अन चर्चेची भाषा बदलण्याची मोठी गरज आहे. उदा. - १)  'सरकारने जनतेच्या आकांक्षा पूर्ण करायला हव्यात.' २) 'जनतेच्या कल्याणासाठी सरकार.' ही दोन्ही वाक्ये भ्रम निर्माण करतात, गोंधळ उत्पन्न करतात, चुकीची मानसिकता निर्माण करतात. याचे खूप वेगवेगळे परिणाम होतात. हे परिणाम केवळ perception चे नसतात, प्रत्यक्ष व्यवहारातही होतात, अंमलबजावणीत होतात. अगदी एखादा प्रबंध लिहिता येईल एवढी त्याची व्याप्ती आहे. 'सरकारचे ध्येय आणि हेतू, लोककल्याण हेच असायला हवे.' ही आणि एवढी शब्दरचना योग्य आणि पुरेशी होऊ शकते. अघळपघळ, भावनेच्या भरात, अन विशिष्ट स्वार्थी हेतू ठेवून वापरली जाणारी भाषा अनिष्ट ठरते. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात प्रचलित असलेल्या भाषेत, शब्दांच्या वापरात, वाक्यरचनेत; खूप सारे बदल करण्याची गरज आहे.

- श्रीपाद कोठे

२५ मे २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा