मंगळवार, ३१ मे, २०२२

मोदी संघ वाद

पंतप्रधान मोदी यांनी रा. स्व. संघाला तंबी दिली अशा बातम्या सुरु आहेत. आज त्यांनी यु.एन.आय. या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीवरून. हा सुतावरून स्वर्ग गाठण्याचा प्रकार मला वाटतो. समजा तसे असेल तरीही त्यातून मार्ग काढायला भाजप आणि संघ समर्थ आहेत.

पण एकदा चर्चा सुरु झाली की ती कशीही वळणे घेते. त्यामुळे प्रसार माध्यमे जे म्हणत आहेत तसे काही नसावे हे गृहीत धरून सुद्धा काही प्रश्न विचारार्थ समोर ठेवावेसे वाटतात.

१) सामाजिक, राजकीय, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक, वैचारिक विश्लेषणे करायचीत की नाही?

२) जिवंत समाजाला मृत समाज बनवायचे का?

३) हिंदूंच्या सगळ्या गोष्टींची चिकित्सा करायची, हिंदूंनी ती सहन पण करायची आणि बाकीच्यांनी अल्पसंख्यकत्वाच्या नावाने अयोग्य संरक्षण मिळवायचे का?

४) अल्पसंख्य, बहुसंख्य या कल्पना योग्य आहेत का?

५) देशात अल्पसंख्य आयोगाऐवजी मानवाधिकार आयोगच फक्त असावा अशी मागणी संघाचे तिसरे सरसंघचालक स्व. बाळासाहेब देवरस यांनीच केली होती, याचे स्मरण किती जणांना आहे?

६) सुरळीत सत्ता या नावाखाली सत्याचा गळा घोटला जावा का?

- श्रीपाद कोठे

१ जून २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा