रविवार, २९ मे, २०२२

पेरियार

आयआयटी मद्रासचा वाद सुरु करण्यात आला आहे. हीच पेरियार रामस्वामी नायकर चळवळ आहे, ज्या चळवळीने हिंदी भाषा, हिंदू देवता, ब्राम्हण; यांच्याबद्दल विद्वेष पसरवून अनेक संघर्ष उभे केले. आर्य-द्रविड असे वाद आणि संघर्ष उभे केले. अन ते केवळ भांडणाचा कंडू शमवून घेण्यासाठी. त्यात राजकारण सुद्धा फारसे नव्हते. आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, केरळ या अन्य दक्षिणी राज्यांमध्ये हे वाद, संघर्ष, विरोध नसल्यासारखेच आहेत; हे लक्षात घेतले की पेरियार चळवळीचे खरे रूप कळेल. डॉ. आंबेडकरांचे नाव लावायचे आणि बुद्धिभेद करायचा हा नवीन धंदा आता त्यांनी सुरु केला आहे. अशा वृत्तींना उखडूनच टाकायला हवे. सगळ्यांनी आयआयटी मद्रासच्या निर्णयाचे स्वागत करायला हवे.

- श्रीपाद कोठे

३० मे २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा