सोमवार, २१ मार्च, २०२२

वेगळा विदर्भ

१) मुंबई, पुणे, नाशिक यापलीकडे जनाधार नसलेले लोकच; श्रीहरी अणे यांच्या विधानावरून गळे काढून तमाशे करीत आहेत.

२) १०५ हुतात्मे झाले. त्यातील विदर्भ, मराठवाडा येथील किती होते?

३) एखाद्या गोष्टीसाठी जीवाची बाजी लावणे याचा अर्थ ती गोष्ट योग्य आहे किंवा त्रिकालाबाधित आहे, असा होतो का?

४) देशाचे तुकडे अन राज्यांची फेररचना या सारख्या बाबी कशा असू शकतात? मग `राज्याचे तुकडे' ही भाषा किती समर्पक आहे?

५) वेगळ्या राज्यामुळे प्राप्त होणाऱ्या बाबी का नाकारल्या जाव्यात?

६) लहान राज्ये प्रगती करणार नाहीत असा आविर्भाव आणताना, या विभागांशिवाय आपले काही खरे नाही हा विचार तर त्यापाठी नाही?

७) एकाच भाषेची अधिक राज्ये झाली तर केंद्रात वजन वाढेल की घटेल?

८) विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण; अशी महाराष्ट्राची पाच राज्ये करावीत.

- श्रीपाद कोठे

२२ मार्च २०१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा