गुरुवार, ३१ मार्च, २०२२

सावधगिरी आणि संशय

कोरोना प्रकरणामुळे स्वच्छता, हायजीन, अंतर अशा गोष्टी पुढे आल्या. ही चांगलीच गोष्ट आहे. यावर बरंच गंभीर आणि गमतीचं बोललं, लिहिलं जातं आहे. या संदर्भात काही वर्षांपूर्वी गाजलेले नॉर्वेतील एक प्रकरण आठवले. एका बंगाली कुटुंबावर लहान मुलांना हाताने खाऊ घालणे, जवळ घेऊन झोपणे अशा काही गोष्टींसाठी कारवाई झाली होती. त्या लहान मुलांना नॉर्वे सरकारने आपल्या ताब्यात घेतले होते आणि बंगाली जोडप्याला परत यावे लागले होते. ही घटना आठवल्यावर वाटले - सावधपणा, सजगता ही संशयीपणात परिवर्तित होऊ नये. आरोग्य इत्यादीची काळजी घेतानाच जगण्याच्या सहजतेने कृत्रिमतेच्या विळख्यात जाण्याचा धोका टाळावा.

- श्रीपाद कोठे

१ एप्रिल २०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा