मंगळवार, २२ मार्च, २०२२

राजकीय लढायातील अपव्यय

राजकीय लढायांमध्ये किती मनुष्यबळ, मनुष्यतास, धन, वेळ, ऊर्जा, व्यवस्थापन, बुद्धी, साधने वाया जात असतील? गिनती करणेही कठीण आहे. करदात्यांचा पैसा वाया जाणे ही एक बाजू आणि जनतेची कामे, जनतेचे सुख, जनतेची मानसिकता, व्यवस्था; या सगळ्याची होणारी हानी आणि नासाडी वेगळीच. का म्हणून समाजाने राजकारणाचा द्वेष करू नये? बाकी चांगली माणसे आली पाहिजेत वगैरे पोपटपंची ज्यांना करायची त्यांनी खुशाल करावी. वर्षानुवर्षे हेच चालत असूनही ज्यांना राजकारणाबद्दल आशावाद वगैरे बाळगायचा असेल त्यांनी स्वतःचा भोंदूपणा कुरवाळत बसायला काहीच हरकत नाही. मात्र त्यामुळे वास्तव बदलत नाही. मग यावर उपाय काय असा शहाजोग प्रश्न विचारून निरुत्तर करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनाही शुभेच्छा. पण उपाय शोधायचा असेल तर सर्वप्रथम उपाय हवा आहे यावर; म्हणजेच आजची स्थिती, व्यवस्था, रचना, विचार कुचकामी आहेत यावर; सहमत व्हायला हवे. अन उपाय शोधायचा आहे ही मानसिकता हवी. फक्त तू तू मी मी करण्याची मानसिकता ठेवून, उपाय काय असा प्रश्न विचारायचा असेल तर त्यातून काहीच निघणार नाही.

- श्रीपाद कोठे

२३ मार्च २०२१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा