मंगळवार, २२ मार्च, २०२२

जीवना !

जीवना ! तू नेहमीच फसवलं आहेस. कसा विश्वास ठेवू तुझ्यावर? आपल्यासाठी जीव टाकणाऱ्यांना आपल्याशी काहीही देणंघेणं नसतं. काय करायचं मग. मृत्यू फार दयाळू. फसवत नाही. आता माणूस अस्तित्वातच नाही हे समजणं, पचवणं सोपं आहे रे. पण माणूस आहे अन तरीही नाही हे कसं समजायचं, कसं पचवायचं? जीवना, तू आता नाही भूरळ घालू शकत. तू दुखावलं आहेस खूप. खूप वाईट वागला आहेस माझ्याशी. अगदी राक्षसासारखा.

- श्रीपाद कोठे

२३ मार्च २०२१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा