शुक्रवार, १८ मार्च, २०२२

निरस समाज

हा काय करतो? तो काय करतो? यातच रस असणारा निरस समाज तयार होतो आहे. काय योग्य? काय अयोग्य? याचा विचार लोकांना नकोसा होतो आहे. अन असा योग्य अयोग्य विवेक केला तरीही तो स्वतःसहित सगळ्यांसाठी असतो हे मान्य करायला फारसे कुणी तयार नसतात. अन हे मान्य केलं तरीही, योग्य-अयोग्य प्रत्यक्ष व्यवहारात येणं ही एक वेगळी प्रक्रिया असते हे डोक्यात शिरत नाही. इंद्रियांना लागलेलं वळण आणि मन बुद्धीच्या अवस्था यातून वाट काढत व्यवहाराला इष्ट वळण द्यायचे असते, दिले जाते. ही एक विलक्षण सापेक्ष आणि धीमी प्रक्रिया असते; याचं आकलन अभावानेच असतं. या सगळ्यापेक्षा आरोप प्रत्यारोप आणि वादावादी सोपी असते. अन मुळातच बहुसंख्य माणसे सुमार असल्याने सोप्या गोष्टी करत राहतात. हे सगळंच स्वाभाविक आहे. फक्त दोन गोष्टी त्रासदायक असतात. या स्वाभाविक प्रक्रियेत माणसं आणखीन सुमार होत जातात अन त्याचं त्यांचं भानही सुटत जातं. अन दुसरी अडचण म्हणजे, या सुमारपणाच्या कक्षेच्या बाहेर असलेल्यांची कुचंबणा होते.

- श्रीपाद कोठे

१९ मार्च २०२१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा