सोमवार, १४ मार्च, २०२२

मुग्धा कर्णिक यांच्या लेखावर

काही चर्चा नजरेस पडल्या. अन वेळ होता म्हणून खोलात गेलो. तेव्हा मुग्धा कर्णिक यांनी दिव्य मराठीत लिहिलेला एक लेख वाचायला मिळाला. त्यांच्याच भिंतीवर. त्या माझ्या मित्र यादीत नाहीत. पण नाव ऐकले आहे. लेख पूर्ण वाचला. पत्रकार, पत्रकारिता, संघ, संघाची सेवाकार्ये, भाजप, अन social media तील troll असे सगळे वाचले. त्यांच्या लेखाखालीच छोटीशी comment करण्याचा विचार होता. पण त्यांनी ती सोय ठेवलेली नाही. त्यामुळे इथे प्रपंच. एकाच मुद्यावर बाईंनी सांगावे- गांधी हत्येच्या मुद्यावर कुमार केतकर यांच्यासारखे महान लोकसुद्धा अजून ज्या पद्धतीने विचार करतात, बोलतात, लिहितात त्यावर आणि त्यांच्या integrity वर तुमचे काय म्हणणे आहे? नव्हे- गांधी हत्येच्या संदर्भात तुमचे स्वत:चे काय म्हणणे आहे? याबाबत खूप लिहिता येईल, लिहिलेही आहे. पण हा जो `राग गांधी हत्या' सतत आळवला जातो त्यावर फक्त जाणून घ्यायला आवडेल. `आम्हाला पटत नाही म्हणून मान्य नाही' हाच तुमच्या बुद्धिवादाचा, चिंतनाचा, लिखाणाचा, निष्कर्षांचा आधार असू नये ही विनंती.

ता.क. - श्रीमती इंदिरा गांधी यांना अटक झाली तेव्हा घरावर आलेल्या मोर्चात माझ्या घराच्या काचा फुटल्या होत्या आणि त्यावेळी पोलीस ठाण्यात तक्रार करणे हेदेखील काय दिव्य होते हे मी जाणतो. अन पत्रकारिता मला अजिबातच नवखी नाही.

- श्रीपाद कोठे

१५ मार्च २०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा