शुक्रवार, २९ एप्रिल, २०२२

स्मारक दत्तोपंतांचे

श्रद्धेय दत्तोपंतजी ठेंगडी यांच्या वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथल्या पैतृक घराच्या संबंधाने एक टिपण आज वृत्तपत्रात वाचायला मिळाले. हे घर राष्ट्रीय स्मारक व्हावे अशी इच्छा त्यात व्यक्त करण्यात आली आहे. हा अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय असल्याने त्याला पाठींबा सुद्धा मिळू शकतो. मला मात्र असे वाटते की- त्या घराचे राष्ट्रीय स्मारक होऊ नये. असे राष्ट्रीय स्मारक स्वत: स्व. दत्तोपंतजी आणि भारतीय चिंतन परंपरा यांच्याशी विसंगत ठरेल. स्मारके, आठवणी, इतिहास इत्यादी विषयीची त्यांची आणि भारतीय चिंतन परंपरेची दृष्टी समाजाच्या मुख्य प्रवाहात आणायला हवी. कर्म, पुनर्जन्म, मुक्ती इत्यादी बाबींचाही त्यासोबत समग्रतेने विचार व्हायला हवा. आज आपण अंतर्बाह्य अपार अभारतीयतेने वेढून गेलेलो आहोत. त्यामुळे हा विचार चुकीचा वा विक्षिप्त वाटू शकेल. परंतु योग्य विचार करू शकणाऱ्या लोकांनी यावर मंथन करायला हवे.

- श्रीपाद कोठे

३० एप्रिल २०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा