शुक्रवार, २९ एप्रिल, २०२२

कृतिशीलता

मानवी प्रयत्न, मानवी बुद्धिमत्ता, मानवी नियोजन, अपार धन, सांघिक प्रयत्न; अशा सगळ्या दीर्घ काळ चाललेल्या गोष्टींना अंगठा दाखवून; निसर्ग स्वतः स्वतःचे नुकसान भरून काढतो आहे. शहराशहरातील वायूप्रदूषण कमी झाले, दर्शनीय शक्ती (visibility) वाढली, नद्या स्वच्छ झाल्या, ओझोनचे छिद्र भरले. मानवी कृतीशीलता वाढवण्याने निसर्ग आणि मानवी स्वास्थ्य यांची हानी होत असेल तर, कुठल्यातरी अगम्य कारणांसाठी मानवी कृतीशीलता सतत वाढवत नेण्याच्या वृत्तीचा, तत्वज्ञानाचा, प्रयत्नांचा; फेरविचार करून त्या कृतीशीलतेला आळा घालायला नको का?

- श्रीपाद कोठे

३० एप्रिल २०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा