बुधवार, २० एप्रिल, २०२२

प्राणवायूने मृत्यू

प्राणवायू मिळत नाही म्हणून मृत्यू होत असतानाच, प्राणवायूमुळे मृत्यू व्हावे. याला नियतीशिवाय काय म्हणणार? चर्चा, दोषारोप खूप होतील. गलथानपणा, तांत्रिकतेचा अभाव इत्यादी इत्यादी. पण याच नाशिकच्या रुग्णालयात प्राणवायूचा उपयोग केला जात होताच. प्राणवायू हाताळणारे लोक होतेच. टँकरवर काम करणाऱ्यांनी याआधीही तेच काम केलेले. पण यापूर्वी अशी दुर्घटना घडली नाही. आताच घडली. काय म्हणायचं? दोषारोप, राजकारण हा सगळा घाणेरडेपणा होईलच. मुद्दा अपघाताच्या समर्थनाचा नाही, दुर्दैवी मृत्यूंची वेदना आहेच. परंतु मानवी प्रयत्न आणि कौशल्ये यापलीकडेही काहीतरी असतं हे ध्यानी घेतलं तर आक्रस्ताळेपणा, अनावश्यक गोंधळ या गोष्टी तर कमी होतीलच. शिवाय कामे अधिक जबाबदारीने पार पाडण्याची वृत्ती विकसित होत जाईल. धीर मात्र हवा.

- श्रीपाद कोठे

२१ एप्रिल २०२१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा