शुक्रवार, २२ एप्रिल, २०२२

कर्जाचे दुष्टचक्र

जागतिक नाणेनिधीच्या ताज्या अहवालात म्हटले आहे की, संपूर्ण जगावर कर्जाचे प्रचंड ओझे असून, त्यामुळे जगाची अर्थव्यवस्था कोलमडू शकते. खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील या कर्जओझ्याचे प्रमाण जागतिक उत्पन्नाच्या २२५ टक्के एवढे मोठे आहे. याचे विपरीत परिणाम होऊन अर्थव्यवस्था कोसळतील आणि मग कर्जाची परतफेड सुद्धा होऊ शकणार नाही, अशी भीतीही अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. आज संपूर्ण जगभरात `ऋण काढून सण साजरे करणे' हाच शिष्टाचार झालेला आहे. यातून खऱ्या अर्थाने संपत्ती निर्माण होते का? नाणेनिधीचा अहवाल लक्षात घेतला तर या पद्धतीने संपत्ती निर्माण न होता, शून्याच्याही खाली घसरते, असेच म्हणावे लागेल. उत्पन्न १०० रुपये आणि देणी २२५ रुपये असतील तर सांपत्तिक स्थिती घसरली असेच म्हणणार ना? या पार्श्वभूमीवर संपत्ती निर्माणाबाबत स्व. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी २५ एप्रिल १९६५ च्या मुंबईतील भाषणात जे विचार मांडले ते मननीय आहेत. अर्थव्यवस्थेतील बचतीचा भारतीय दृष्टीकोन मांडणारे ते विवेचन आहे. भारतीय गृहिणीचे अर्थशास्त्र; तसेच इस्लामिक आणि जैन अर्थशास्त्रसुद्धा याच बचतीच्या सिद्धांतावर आधारलेले आहे. पोरकट, बालिश, हास्यास्पद; अशी त्याची संभावना करता येईल, करणारे करतीलही; नव्हे करतातच. अलीकडेच लोकसत्ताचा अग्रलेख असाच शेलका शेरेबाजी करणारा होताच. निमित्त होते सरसंघचालकांचे मुंबई stock exchange मधील भाषण. ज्यात त्यांनी भारतीय अर्थविचार मध्यवर्ती असावा असा मुद्दा मांडला होता. दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडलेला संपत्ती निर्माणाचा `बचत सिद्धांत' हा भारतीय अर्थविचार आहे. व्यक्तीपासून देशापर्यंत आणि पुढे संपूर्ण जगाचाही तो विचार व्हावा. नाणेनिधीच्या अहवालाने ते अधोरेखित केले आहे. ऋण काढून सण साजरे करण्याने ना संपत्ती निर्माण होत, ना अर्थव्यवस्था उभ्या राहात. बचतीचा राजमार्ग मात्र संपत्ती निर्माण करून अर्थव्यवस्थाही बळकट करतो.

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या भाषणातील अंश-

`प्रत्येक को काम अर्थव्यवस्था का आधारभूत लक्ष्य होना चाहिए. अर्थात स्वस्थ एवं सवय व्यक्ति के लिए अपनी गृहस्थाश्रम की आयु में जीविकोपार्जन की व्यवस्था होनी ही चाहिए. आज एक ओर- १० वर्ष का बालक और ७० वर्ष का बुढा काम में जुता हुआ है तो दूसरी ओर २५ वर्ष का नौजवान बेकारी से उबकर आत्महत्या कर बैठता है. इस अव्यवस्था को दूर करना होगा. केवल हाथ उत्पादक नहीं बन सकते. उनके लिए पूंजी का सहयोग चाहिए. श्रम और पूंजी में से किसी की भी अवहेलना नहीं की जा सकती. पूंजी निर्माण के लिए आवश्यक है कि संपूर्ण उत्पादन का उपभोग करने के स्थान पर उसमे से कुछ बचाया जाए और उसे भावी उत्पादन के लिए काम में लिया जाए. उपभोग में संयम के बिना पूंजी नहीं बनेगी. कार्ल मार्क्स जिस अतिरिक्त मूल्य की चर्चा करता है वही पूंजी निर्माण का आधार है. पूंजीवादी अर्थव्यवस्था में उद्योगपति इस अतिरिक्त मूल्य के सहारे पूंजी निर्माण करता है. समाजवादी व्यवस्था में यह काम राज्य के द्वारा होता है. दोनों ही पद्धतियों में संपूर्ण उत्पादन का वितरण श्रमिकों में नहीं होता. यदि उत्पादन की पद्धति बड़े पैमाने की और केंद्रित रही तो पूंजी निर्माण के लिए श्रमिक के द्वारा किये गए संयम और त्याग का भी भान नहीं होता. विकेंद्रीकरण में यह लाभ है कि पूंजी के रूप में इस अतिरिक्त मूल्य के प्रयोग में श्रमिक का भी हाथ रह सकता है.' (पंडित दीनदयाल उपाध्याय, राष्ट्रीय जीवन के अनुकूल अर्थरचना - २५ एप्रिल १९६५)

- श्रीपाद कोठे

२३ एप्रिल २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा