मंगळवार, १२ एप्रिल, २०२२

Hyper sensitivity

एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाला तर नातेवाईक, आप्त आणि त्रयस्थ यांची विशिष्ट प्रतिक्रिया असते. अन डॉक्टरची अवस्था दयनीय होते. बलात्काराच्या घटनेचेही असेच असते. घटना खरीच असते, अयोग्यच असते, संताप आणणारीच असते. पण त्यावरील प्रतिक्रिया आणि attitude योग्य असतातच असे नाही. प्रशासन म्हणून कडक भूमिका आणि क्रिया आवश्यकच. मात्र समाज म्हणून या गोष्टीचा जेवढ्या शांतपणे विचार करायला हवा तेवढा केला जात नाही. अन याच hiper sensitivity चा गैरफायदा राजकारणी घेतात. राहुल गांधी यांनी मध्यरात्री इंडिया गेटवर हेच केले. राजकारण्यांनी राजकारण करण्यापेक्षा आणि समाजाने अधिक सजग, pro active राहून आपल्या आजूबाजूला अशा घटना होणार नाहीत याची काळजी घेणे, वातावरण चांगले ठेवणे, मदतीचे अन्याय पर्याय उपलब्ध करणे, २४×७ आपण तयार असणे; या गोष्टी व्हायला हव्यात. नुसते आरडाओरडा करणे ना प्रसार माध्यमांना शोभत ना समाजाला. आपला आधार वाटला पाहिजे ही भावना वाढली पाहिजे. कोणावर तरी जबाबदारी टाकणे, कोणाला तरी अडचणीत टाकणे, कोणाला तरी खाली मान घालायला लावणे, कोणावर तरी point score करणे; हे आपल्याला हवे आहे की; घटना घडू नये हे हवे आहे? वाईट वाटले, लागले, दुखले तरीही; हे सांगणे- बोलणे- लक्षात घेणे आवश्यक आहे.

- श्रीपाद कोठे

१३ एप्रिल २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा