गुरुवार, २८ एप्रिल, २०२२

मुळाशी पोहोचावे

श्रीलंकेतील घडामोडींनी मुस्लिम दहशतवाद पुन्हा चर्चेत आला आहे. उपायांची चर्चाही सुरू आहे. हे सारे ठीकच आहे. पण मुळाशी पोहोचणारे नाही. आणि मुळाशी पोहोचणारे प्रयत्न केल्याशिवाय या समस्येतून कायमस्वरूपी मुक्तीही मिळणार नाही. या समस्येच्या मुळाशी दारूल हरब व दारूल इस्लाम अशी जी शिकवण/ मांडणी केली जाते ती आहे. मदरसे बंद करणे वगैरे वरवरचे उपाय आहेत. ही मूळ मांडणी आणि शिकवण मनातून, विचारातून काढून टाकणे; हा खरा उपाय आहे. अन तेच आव्हानही. धर्म, तत्वज्ञान, शिक्षण, साहित्य, कला, विज्ञान या जीवनांगाचे ते काम आहे. वर्तमान प्रयत्नांपेक्षा हे प्रयत्न वेगळे राहतील. राजकीय, लष्करी, सामाजिक यांच्याहून वेगळे असे हे प्रयत्न राहणे अपरिहार्य आहे. हे सगळे नीट समजून घेणे आणि असे प्रयत्न सुरू होणे हे मात्र आवश्यक आहे.

- श्रीपाद कोठे

२९ एप्रिल २०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा