मंगळवार, १२ एप्रिल, २०२२

decongestion

नागपूरचे लोकप्रिय खासदार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ताजी मुलाखत काल झी बिझिनेस वर पाहिली. जमीन अधिग्रहण विधेयकापासून मंत्रिमंडळ विस्तारापर्यंत अनेक विषय होते. अन असेच फारसे महत्व नसलेले वा तात्पुरते महत्वाचे विषयच लोकांच्या लक्षात राहतात. पण एक खूप मोठा, महत्वाचा आणि दूरगामी मुद्दा त्यांनी मांडला. तो लक्षात घेणे अतिशय गरजेचे आहे. मुलाखत घेणाऱ्या अमिष देवगणने त्यांना विचारले- `दिल्लीत विकास कामांवर घालण्यात आलेल्या बंदीचे काय?' (याविषयी मला माहिती नाही. हा विचारलेला प्रश्न होता.) त्यावर गडकरी म्हणाले ते महत्वाचे आहे. ते म्हणाले- ही बंदी अतिशय योग्य आहे. अन केवळ दिल्लीच नव्हे तर सगळ्याच मोठाल्या शहरांचं decongession करण्याची आवश्यकता आहे. आज कोणीही इतक्या स्पष्टपणे, धाडसाने आणि ठामपणे हे बोलत नाही. विकासाची आणि माणसांचीही जी धाव सुरु आहे ती भयंकर चुकीची आहे आणि तो प्रवाहच उलटा फिरवण्याची गरज आहे. गडकरींनी ही भूमिका मांडली, यासाठी त्यांचे जाहीर अभिनंदन.

फक्त काही गोष्टी नमूद कराव्याशा वाटतात. गेली अनेक वर्षे मी सातत्याने ही भूमिका मांडत आलो आहे. त्यावर लिहित आलो आहे. अगदी पंतप्रधानांना सुद्धा माझ्या सूचना पाठवल्या आहेत. मला एवढंच सुचवायचं आहे की याबाबत त्यांनी गंभीर आणि सजग असायला हवं. उदाहरण म्हणून दोन गोष्टी- १) मुंबईचा विकास आराखडा आणि २) नागपूरच्या विकासाचा प्रयत्न. माझ्या मते या गोष्टींचाही, शहरांच्या decongession च्या संदर्भात विचार व्हायला हवा.

- श्रीपाद कोठे

१३ एप्रिल २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा