शनिवार, ३० एप्रिल, २०२२

प्रतिके

मनात जन्म घेणाऱ्या ईश्वराला व्यक्त करण्याच्या प्रयत्नात त्याला कोणत्या ना कोणत्या प्रतिकात (मूर्ती, माणूस, पुस्तक, शब्द, भाव, वस्तू, वास्तू किंवा आणखीन काही) बांधले जाते. पुढे ते प्रतीकच ईश्वर ठरते. त्याही पुढे त्या प्रतिकाशिवाय दुसरे काही ईश्वर नाही अशी धारणा जन्म घेते. इथून पंथवेडाला सुरुवात होते. उदात्तता आणि उत्कटतेच्या आवरणात भक्ती माणसाला खुजे करते. परिणामी व्यक्ती आणि समाज दोघांचेही नुकसान होते. असे होऊ नये यासाठी वेळोवेळी प्रतिकाच्या मर्यादेच्या ज्ञानाची जाणीव करून द्यावी लागते. ज्ञान आणि भक्ती यांच्या आंतरिक देवाणघेवाणीतून सार्थक प्रवास होतो.
******************
काँग्रेसने देशाच्या स्वातंत्र्याचा संघर्ष केला. देश जागा केला, एक केला. देशाच्या पुरुषार्थाचे ती प्रतीक ठरली. पण या प्रतिकालाच देश, देशभक्ती इत्यादी ठरवण्याचा प्रयत्न झाला. देशभक्तीच्या प्रतिकाची मर्यादा दुर्लक्षित केली गेली. काँग्रेस आणि देश त्याचे परिणाम भोगतो आहे.
******************
अनेकांना आवडणार नाही पण सध्या हिंदुत्वाला प्रतिकांशी, पक्षाशी बांधण्याचा प्रयत्न होतो आहे. वेळीच काळजी घेतली नाही तर परिणाम भोगावे लागतील.

- श्रीपाद कोठे
१ मे २०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा