रविवार, २४ एप्रिल, २०२२

समाजाचं भलंबुरं

समाजाचं भलंबुरं समाजावर अवलंबून असतं, सत्तेवर नाही; या सिद्धांतावर आधारित हजारो वर्षांच्या प्रयत्नांमुळे आज आपण सुस्थितीत आहोत. आज मूळ सिद्धांत आपण सोडून दिल्यासारखा दिसतो आहे. तसे प्रयत्न ही दूरचीच गोष्ट. वाद आणि संघर्ष फक्त यासाठी की माझा गट की तुझा. नाही तर सगळे सारखे असा निष्कर्ष काढून हतबलता अन दोषारोपण. असंच चालत राहिलं तर पुढील १०० वर्षात आपण नष्ट होऊ का, असा विचार मनात येऊन जातो. अगदी हृदयाच्या तळापासून 'सत्ता' उखडून टाकलेले किती आहेत? किमान मनामनातील 'सत्ता' उखडून टाकणे आवश्यक असं मनातून वाटणारे किती. अगदी 'सत्ता हे साधन आहे साध्य नाही' अशी गुळमुळीत भूमिका सुद्धा नको. सत्तेचं काय करायचं त्याची स्वतंत्र चर्चा करू, पण समाजाचं हित अहित फक्त आणि फक्त समाजावर अवलंबून असतं हे भिनायला हवं. नाही तर कठीण आहे.

- श्रीपाद कोठे

२५ एप्रिल २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा