शनिवार, ९ एप्रिल, २०२२

चलन निर्मिती

अर्थकारणात आज चलनाचे महत्व जगभरातच वाढले आहे. किंबहुना ते वाढवण्यात आले आहे. ते कमी करणे आवश्यक आहे. ते कसे करता येईल यावर मंथन व्हायला हवे. अभ्यासक, तज्ञ, जाणकार, यात रुची असणारे, समाजाबद्दलच नव्हे तर स्वत:विषयी, माणसाच्या चांगल्या जीवनाविषयी आस्था असणाऱ्या, चिंता आणि चिंतन करणाऱ्या सगळ्यांनी यावर विचार करायला हवा. विषय खूप मोठा आहे. तूर्त एकच संकेत पुरेसा आहे की, शस्त्रात्रे, मद्य, अन्य अमली पदार्थ, सगळ्या प्रकारची तस्करी या आणि अशा गोष्टीतून चलनाची निर्मिती मोठ्या प्रमाणात होते. या गोष्टींची ती inherent ताकत आहे. मात्र धान्य, भाजीपाला, कापडचोपड, शरीरश्रम, खनिजे यासारख्या गोष्टींची inherent चलननिर्मिती क्षमता कमी आहे. परिणाम असा होतो की, अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात चलननिर्मिती होऊन ते ज्यांच्या हाती जाते, त्यांचा जमीन, पाणी, हवा, माणसे या सगळ्या मुलभूत गोष्टींवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न असतो. आज अर्थकारणात जे पाहायला, अनुभवायला मिळत आहे, तो याचाच परिणाम आहे.

- श्रीपाद कोठे

१० एप्रिल २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा