गुरुवार, २८ एप्रिल, २०२२

शास्त्र अन व्यवहार

आरोग्य हा सध्या मोठा विषय आहे. स्वाभाविकच ऍलोपॅथीशिवाय आयुर्वेद, होमिओपॅथी, योग इत्यादींची चर्चाही होते. उपाय सुचवले जातात. केलेही जातात. अन टीकाटिप्पणीही होते. विशेषतः ऍलोपॅथी सोडून अन्य उपचार पद्धतींवर. ऍलोपॅथीची गृहितके, अध्ययन, अध्ययन- विचार- संशोधन- पद्धती; यांच्या आधारे विश्लेषण केले जाते. म्हणजे ऍलोपॅथीच्या चौकटीत न बसणारे म्हणून अनेक गोष्टी टीकेचे लक्ष्य होतात. प्रश्न आहे, ऍलोपॅथीच्या बाहेर काही असू शकत नाही का? जे ऍलोपॅथीला ठाऊक नाही ते असूच शकत नाही का? अशा विज्ञानवादी, शास्त्रीय विचार करणाऱ्या टीकाकारांना एक प्रश्न विचारावासा वाटतो की, मूल कसं होतं याचं शास्त्रीय ज्ञान नसताना माणसाला मुलं होत नव्हती का?

- श्रीपाद कोठे

२९ एप्रिल २०२१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा