शुक्रवार, २२ एप्रिल, २०२२

No... No...

सध्याची परिस्थिती अभूतपूर्व आहे. अनेक अर्थांनी. या स्थितीत मनोनिग्रह सुद्धा अभूतपूर्वच लागेल. ज्यांना हे पटतं त्यांनी त्याचा अधिकाधिक अवलंब करावा लागेल. सगळ्याच गोष्टींवर अभूतपूर्व ताण आहे. काम करणाऱ्या लोकांवर ताण आहे, काम न करणाऱ्यांवर ताण आहे, रुग्णालये- डॉक्टर्स- नर्सेस- या क्षेत्रातील अन्य लोक यांच्यावर ताण आहे, पोलिसांवर ताण आहे, राजकारण्यांवर ताण आहे, सरकारवर ताण आहे, प्रशासनावर ताण आहे, इमारतींवर ताण आहे, यंत्रणांवर आणि रचनांवर ताण आहे, अर्थकारणावर ताण आहे. ताण नाही कशावर? अन या ताणाची कारणे मानवीय आणि मानवेतर अशी दोन्हीही आहेत. त्यामुळे या स्थितीत समर्थांचा 'जनी वादविवाद सोडून द्यावा' हा उपदेश सतत स्वतःला सांगण्याची गरज आहे. अर्थात हा माझा उपदेश नाही अपेक्षा आणि इच्छा आहे. माझी अपेक्षा आणि इच्छा पूर्ण केलीच पाहिजे असं कोणावर बंधन असण्याचं किंवा तसा नैतिक वा अन्य दबाव असण्याचंही कारण नाहीच. प्रत्येक जण स्वतंत्र आहे. फक्त एवढंच वाटतं की, अत्यंत मनोनिग्रहाने स्वतःला सांगायला हवे की - टीकाटिप्पणीला, दोषारोप इत्यादीला, जबाबदाऱ्या आदी ठरवण्याच्या घाऊक चर्चांना, अनावश्यक विश्लेषणांना no म्हणजे no. अगदी a Big Big No. अनेकांना ही अपेक्षा आवडणार नाही, अनाठायी वाटेल. त्यांना तो अधिकार आहे. मात्र आम्ही स्वतःला किती मर्यादा घालून घेतो यावरून आपली समाज म्हणून पत आणि प्रत ठरेल. स्निग्ध ज्योतीचा प्रकाश हवा असेल तर समई होऊन धग सोसण्याची तयारी असायला हवी.

- श्रीपाद कोठे

२३ एप्रिल २०२१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा