गुरुवार, ७ एप्रिल, २०२२

काही कल्पना

कोरोनोत्तर चित्र कसं असेल याची चर्चा होते आहे. त्या अनुषंगाने काही कल्पना -

- जागतिक स्तर, जागतिक मापदंड, जागतिक कल्पना, जागतिक दर्जा इत्यादीतून बाहेर पडलं पाहिजे. मानसिकता, व्यवस्था, योजना अशा सगळ्या गोष्टींना हे लागू करावं लागेल.

- आपण आपलं मॉडेल उभं करावं. बाकी जगाकडे दुर्लक्ष न करता, त्यांच्या अपेक्षांचं ओझं न बाळगता आणि त्यांच्या दबावात न येता.

- देशात ५०० राजधान्या विकसित कराव्या. या सगळ्या ठिकाणी infrastructure, शिक्षण, आरोग्य, प्रशासन, अन्न, वीज, स्वच्छता, दळणवळण, सुरक्षा; अशा सगळ्या गोष्टी समान दर्जाच्या असाव्या.

- पैसा, निर्णय प्रक्रिया, नियोजन, r & d; अशा अधिकाधिक गोष्टी या ५०० ठिकाणी व्हाव्या.

- विकेंद्रीकरण. पण ते म्हणजे केंद्रीय सत्तेने केलेले वाटप असे स्वरूप नसावे. सगळ्या जीवनाचं केंद्रच या ५०० ठिकाणी असावं.

- केंद्रीय सत्ता समन्वय, निरीक्षण, साहाय्य, मार्गदर्शक अशी असावी.

- राज्य हे एकक रद्द करून; केंद्र आणि जिल्हा हीच पद्धत आणावी. दैनंदिन जीवनासाठी महापालिका आणि बाकी गोष्टींसाठी सरकार अशी व्यवस्था सगळ्या ५०० ठिकाणी असावी.

- ५०० ठिकाणांच्या सरकार प्रमुखांना मुख्यमंत्री म्हणावे.

- हे करताना महानगरीय vested interest विरोध करतील, कुरकुर करतील; त्यासाठीचे mechanism तयार करावे.

- यामुळे होणाऱ्या सामाजिक, आर्थिक, राजकीय बदलांचा विस्तृत, तपशीलवार आढावा वेळोवेळी घेण्यासाठी; बदलणाऱ्या माणसांची कायम व्यवस्था उभी करावी.

- श्रीपाद कोठे

८ एप्रिल २०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा