बुधवार, २० एप्रिल, २०२२

शहरी माणूस आणि पाणी

शहरी माणूस पाणी समस्येसाठी काय करू शकतो?

१) पाण्याच्या बाटल्या विकत घेणे बंद करू शकतो. अगदी प्रवासात सुद्धा घरून १-२ बाटल्या घेऊन जाण्याचा आग्रह ठेवला तर पाणी लॉबी, पाणी माफिया यांना आळा घातला जाईल.

२) हॉटेलात सुद्धा साध्या पाण्याचा आग्रह. हे साधे पाणी स्वच्छ ठेवावे यासाठी हॉटेलला आग्रह. प्रतिष्ठेच्या खोट्या कल्पनांचा त्याग. विशेषत: महिला व मुलींनी हे करावे. बावळट पुरुष आपोआप तसे करतील. महिला वर्गाच्या आग्रहाखातर किंवा प्रभाव पडावा म्हणून पाण्याची बाटली घेतली जाते.

३) किमान दोन वृक्ष लावणाऱ्या, हॉटेलच्या प्रमाणात माती मोकळी ठेवणाऱ्या अन rain water harvesting करणाऱ्या हॉटेलमध्येच जाणे. या गोष्टींसाठी त्यांच्याकडे आग्रह धरणे. यासाठी लहान लहान गट करणे. मोठे गट नकोत. जाणीव उत्पन्न करणे अन सततच्या आग्रहाने कृती करायला लावणे एवढ्या मर्यादित कामासाठी.

४) शाळा, महाविद्यालये, संस्था, मंडळे, वाचनालये, अन्य जाहीर कार्यक्रमात मंचावर किंवा अन्यत्र पाण्याच्या बाटल्या ठेवण्यापेक्षा लोटी-पेला आणि स्वच्छ पाण्याची स्वतंत्र व्यवस्था करणे.

- श्रीपाद कोठे

२१ एप्रिल २०१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा