बुधवार, २७ एप्रिल, २०२२

आमीर मोहनजी

नाही म्हणायला आता आमीर खानने सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते दीनानाथ मंगेशकर पुरस्कार स्वीकारला आहे, तेही लतादीदींच्या उपस्थितीत. नंतर त्यांचे भाषणही ऐकले अर्धा तास. त्या भाषणाला सगळ्यांनी उभे राहून उत्कट प्रतिसाद दिला. दुसरीकडे पाणी फौंडेशनच्या द्वारे आमीर महाराष्ट्राच्या गावागावात फिरतो आहे. त्याच्यासोबत किरण वहिनीही असतात. सगळेच एकूण छान, शांत, सुखद चालू आहे. आता किरण वहिनींनी एकदाचे टीव्ही camera पाहून म्हणून टाकावे- भारतात फिरायला आता भीतीबिती नाही वाटत. कुठेच असहिष्णुता वगैरे नाही. भारत हा सगळ्यांनी राहण्यासारखा छान देश आहे. मग पाहू या काही गमतीजमती होतात की, धोरणात्मक शांतता राहते किंवा आणखीन काही. असहिष्णू वगैरे म्हटल्यानंतर किंवा पीके वगैरे चित्रपट बनवल्यानंतर सुद्धा सरसंघचालकांनी मोकळ्या मनाने त्यांचे कौतुकच नव्हे अभिवादन केले. उमदेपणाने त्यांना स्वीकारले. किरण वहिनींनी जर कबुली दिलीच भारताच्या सहिष्णुता अन सुरक्षिततेची तर कोण कोण त्यांना प्रत्यक्ष किंवा परोक्ष जवळ वा दूर ठेवेल हे पाहणं मनोरंजक नक्कीच राहील.

- श्रीपाद कोठे

२८ एप्रिल २०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा