शनिवार, ३० एप्रिल, २०२२

तृष्णा

आजकाल भगवान बुद्ध हे एक status symbol अन icon झाले आहेत. त्यांचे अनुयायी असलेले वा नसलेले, संवेदनशील असणारे कलाकार- विचारवंत, सामाजिक जाणीवा असणारे लोक, एवढेच नाही तर दिवाणखान्याला शोभा येते म्हणून त्यांची मूर्ती वा तसबिरी लावणारेही; बुद्धाबद्दल, त्यांच्या जीवनातील प्रसंगांबद्दल, त्यांच्या विचारांबद्दल. त्यांच्या सुविचारांबद्दल, त्यांच्या मार्गाबद्दल बोलत असतात. पण एक जाणवते, त्यातील एखादा अपवाद सोडला तर किती जणांना त्यांच्या मूळ चिंतनाबद्दल आस्था असते. भगवान बुद्ध म्हणत- तृष्णा हीच सगळ्या अनर्थाचे, अशांतीचे, संघर्षाचे मूळ होय. त्यामुळे तृष्णा टाकून द्यायला हवी. त्यांचे नाव घेणाऱ्यांमध्ये, त्यांचा हा विचार किमान पटणारे तरी किती असतील.

एक गंमत- एकदा रेल्वेने नागपूरला परतत असताना वर्धेहून काही मुले मुली डब्यात चढली. त्यातील एक मुलगी माझ्या शेजारच्या जागेवर येऊन बसली. बोलघेवडी होती. त्यावरून कळले ती बौद्ध आहे. तिचे नाव होते- तृष्णा. अन यावर तिनेच टिप्पणीही केली होती, तृष्णा सर्व अशांतीचे मूळ कारण आहे, अशी.

आता बोला...

- श्रीपाद कोठे

१ मे २०१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा