सोमवार, २५ एप्रिल, २०२२

देवाची निवृत्ती

एकदोन ठिकाणी पोस्ट वाचल्या-

`बुद्धी, प्रयत्न आणि विज्ञान यांच्या साहाय्याने सारं काही प्राप्त करून घ्यायला हवं. आता देवाचा हा आधार टाकून देऊन त्याला निवृत्त करायला हवं.'

चटकदार परंतु उथळ हा वर्तमान युगाचा गुण पुन्हा प्रत्ययाला आला. मनात आले- मीरेला काय कमी होते म्हणून ती महाल सोडून रस्त्यांवर फिरत राहिली? भगवान बुद्धांना काय कमी होते की सगळे बाजूस सारून त्यांनी जंगलाचा रस्ता धरला? भक्तश्रेष्ठ प्रल्हाद तर बोलूनचालून राजपुत्र होता. त्याला नारायणाचे नाव का घ्यावेसे वाटले? आजही उच्च विद्याविभूषित तरुण तरुणी रामकृष्ण मिशन, चिन्मय मिशन, इस्कॉन वगैरे ठिकाणी जाऊन साधे, अनाम आयुष्य का जगतात? गेला बाजार, `the monk who sold his ferari' कशासाठी? आपल्या मगदुरानुसार निरीक्षण, विश्लेषण करून शाश्वत सिद्धांत प्रतिपादित करायचे, हे जरा जास्तच होतं नाही का?

- श्रीपाद कोठे

२६ एप्रिल २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा